जागतिक रंगकर्मी दिवस २०२१ च्या सोहळ्यांतर्गत प्रख्यात रंगकर्मी प्रदीप कबरे यांच्या ‘दिल धक धक करे’ नावाच्या स्वलिखित पुस्तकाचे उत्सवमूर्ती अशोक सराफ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले होते. याच पुस्तकावर आधारित नाटकाचा २४ मे रोजी प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली येथे शुभारंभ झाला. हे नाटक तमाम प्रेक्षकवर्गाच्या पसंतीस उतरत आहे. ‘दिल धक धक करे’ हे एक कौटुंबिक विनोदी नाटक आहे. त्यामुळे, या सहकुटुंब सहपरिवार हे नाटक तुम्ही एन्जॉय करू शकता! अमर आणि अंजली या आनंदी विवाहित जोडप्याची ही कथा आहे. अमरला नेहमी त्याच्या तब्येतीबद्दल शंका असते ज्यामुळे अंजलीच्या मनात एक वेगळाच गैरसमज निर्माण होतो. त्यांचे कौटुंबिक डॉक्टर घोरपडेदेखील बरेच गोंधळ निर्माण करतात. अमरचा…
Author: गायत्री देवरुखकर
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हळूहळू सर्व नाट्यगृहं १००% आरक्षणावर सुरू झाली. मात्र तमाम रसिक प्रेक्षक आणि रंगकर्मींसाठी सोईस्कर आणि मध्यवर्ती असलेलं माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर अद्याप सुरू झालेलं नाही. बऱ्याच रंगकर्मींनी त्याबद्दल खंतही व्यक्त केली आहे. कित्येक महिने प्रेक्षक व रंगकर्मी हे नाट्यगृह सुरू होण्याची वाट बघत आहेत. पण आज यामागचे कारण उघडकीस आले आहे. दोन वर्षांनंतर रंगभूमी उभी होत असताना हे नाट्यगृह बंद असणं म्हणजे आपलं दुर्दैवच आहे, असे मनोगत अभिनय कल्याण संस्थेचे संस्थापक आणि दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांनी व्यक्त केले आहे. तसेच, लेखक-दिग्दर्शक यश नवले यांनीही आपण या नाट्यगृहाला यशवंत नाट्य ‘मंदिर’ असे संबोधतो असे म्हणत, तेथील काम लवकर…
२०१७ साली कोल्हापुरातील प्रत्यय हौशी नाट्य संस्थेने कॉ. संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्टच्या सहयोगाने नाट्य महोत्सवाच्या आयोजनास सुरूवात केली. प्रत्ययची निर्मिती असणारे नाट्याविष्कार आणि महाराष्ट्र व भारतभरात सुरू असणाऱ्या प्रायोगिक नाटकांना कोल्हापुरात रंगमंचित करण्याची यामागे भूमिका होती. २०१७, २०१८ आणि २०१९ अशी तीन वर्षे सलग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कोल्हापुरातील जाणकार रसिक आणि समीक्षकांनी या महोत्सवाला उत्तम दाद दिली आणि महोत्सव यशस्वी केले. २०२० आणि २०२१ साली लॉकडाऊनच्या काळातही प्रत्ययतर्फे बरेच ऑनलाईन उपक्रम राबविले गेले. यंदा प्रत्यय नाट्य महोत्सव २०२२ चे हे चौथे वर्ष आहे. हा नाट्यमहोत्सव रा. शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे पार पडणार आहे. यावर्षी महोत्सवात…
प्रसिद्ध नाटककार, गूढकथाकार, दिग्दर्शक रत्नाकर मतकरी ह्यांचा १७ मे २०२२ हा दुसरा स्मृतिदिन आहे. या ज्येष्ठ रंगकर्मीस आदरांजली म्हणून दिग्दर्शक संतोष वेरुळकर रत्नाकर मतकरी लिखित ‘पोलीस — पोलीस’ हा नवा दीर्घांक १४ मे २०२२ पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या ९० मिनिटांच्या दीर्घांकात समाजातील विसंगतीवर भाष्य केलं गेलं आहे. ‘पोलीस पोलीस’ या दीर्घांकाचं महत्वाचं वैशिष्टय असं की केवळ तीन कलाकार, पाच तंत्रज्ञ आणि सुटसुटीत तसेच वाहतुकीस अत्यंत सोपी अशी नेपथ्यरचना यामुळे हा प्रयोग अत्यंत किफायतशीर खर्चात कुठेही सादर करता येतो. नाट्यगृहातील बंदिस्त प्रयोगदेखील तितकाच रंगतदार व्हावा आणि मोजक्या प्रेक्षकांत व उपलब्ध रिसोर्सेसमध्येही प्रयोग उठावदार करता यावा अशी नाटकाची बांधणी आहे.…
तुम्हाला कोणी विचारलं की ‘प्रेम म्हणजे काय?’ तर तुमचं उत्तर काय असेल? बरं! हाच प्रश्न तुम्हाला वयाच्या १० व्या किंवा १५ व्या वर्षी विचारला असता तर? किंवा अजून १०-१५ वर्षानंतर विचारला असता तर? तुमचं उत्तर नक्कीच बदललं असतं ना? माणसाच्या आयुष्यात वेळोवेळी घडणाऱ्या घटनांचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि सभोवतालच्या माणसांचा त्याच्या विचारांवर परिणाम होत असतो. जर्मन लेखक क्रिस्टो शागोर लिखित, मृण्मयी शिवापूरकर अनुवादित आणि सपन सरन दिग्दर्शित ‘तमाशा थिएटर’च्या ‘लव्ह यू’ या नाटकातील ज्युलियनच्या बाबतीतही असंच होतं. त्याच्या पालकांचा घटस्फोट होतो. त्यामुळे त्याचा प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. प्रौढावस्थेत एका व्यक्तीचं प्रेम समोरच्या व्यक्तीसाठी असं क्षणार्धात आटून जाऊ शकतं? असा प्रश्न त्याला पडतो.…
आम्ही काही दिवसांपूर्वी कणकवली आणि कोल्हापूर येथे सादर होणाऱ्या परिवर्तन कला महोत्सवाबद्दल तुम्हाला इत्यंभूत माहिती दिली होती. कणकवलीत रंगणार तीन दिवसीय परिवर्तन कला महोत्सव! कणकवलीनंतर आता कोल्हापूरात रंगणार तीन दिवसीय परिवर्तन कला महोत्सव! या तीन दिवसीय महोत्सवाला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे पुन्हा एकदा आता मुंबईतही हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. स्थळ: पु. ल. देशपांडे सभागृह — पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, दादर प्रवेश सर्वांसाठी खुला! परिवर्तन कला महोत्सव वेळापत्रक दि. १३ मे रोजी, रात्रौ ८ वाजता महोत्सवाची सुरुवात बहिणाईंच्या कविता व गाण्यांवर आधारित अरे संसार संसार या सुरेल मैफिलीने होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना विजय जैन यांची असून दिग्दर्शन नारायण बाविस्कर…
शंभर टक्के खरं कधीच कोणी बोलत नसतं. प्रत्येकजण काही ना काही लपवाछपवी करत असतो. ही लपवाछपवी जर नवरा बायको मधली असेल तर मग सगळा मामला कठीण होऊन बसतो. नवरा बायकोच्या नात्यातील लपवाछपवीचा हा खेळ आणि त्यातून उडणारी तारांबळ, तारेवरची कसरत, झालेली गोची याची सगळी धमाल म्हणजे ‘छुपे रुस्तम’ हे नाटक! ‘द लाय’ या फ्रेंच नाटकावर हे नाटक बेतलं आहे. ऋषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव हे दोन्ही हरहुन्नरी अभिनेते आगामी ‘छुपे रुस्तम’ या नाटकासाठी एकत्र आले आहेत. या दोघांसोबत मयुरा रानडे आणि कृष्णा राजशेखर या नाटकात काम करतायेत. विनोदाचा डोस देत नवरा बायकोच्या नात्यातील अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न ‘छुपे रुस्तम’ हे नाटक…
आम्ही काही नाटकांसाठी Giveaway जाहीर करून प्रेक्षकांना नाटकांची मोफत तिकिटे जिंकण्याची संधी प्राप्त करून देत असतो. जर तुम्हाला अद्याप या कॉन्टेस्टबद्दल काहीच माहिती नसेल तर पुढील लेख नक्की वाचा. ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे!’ नाटकाची तिकिटे जिंकण्याची सुवर्णसंधी [Free Tickets Giveaway] या महिन्यात ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकासाठी बोरिवली, ठाणे व डोंबिवली अशा तीन ठिकाणी Giveaway कॉन्टेस्ट सुरू होता. तीनही ठिकाणांहून प्रेक्षकांकडून Giveaway ला उत्तम प्रतिसाद मिळाला. हा Giveaway आयोजित करण्यात आम्हाला ज्यांनी सहकार्य केले, असे वेद प्रोडक्शन हाऊसचे गोपाळ अलगेरी आणि विनय अलगेरी! या निर्मात्यांचे आम्ही मन:पूर्वक आभार मानतो. Giveaway जिंकलेल्या विजेत्यांनी आमच्यापर्यंत नाटकाबद्दल प्रतिक्रिया पाठविल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे:…
मुंबई नगरीच्या हृदयस्थानी वसलेले दादर येथील नाट्यरसिकांचे लाडके, ‘श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह’ पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे आणि तेही अगदी नव्या रुपात! कित्येक अजरामर कलाकृतींनी संपन्न अशा या पवित्र वास्तूचा ताजातवाना चेहरा जगाच्या कानाकोपऱ्यात पसरावा आणि नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालेल्या श्री शिवाजी मंदिरचे नवे रुपडे नाट्यरसिकांना बघता यावे, या मनीषेने आम्ही २७ एप्रिल रोजी, श्री शिवाजी मंदिरची भेट घेतली आणि ही ‘Exclusive’ भेट आम्ही व्हिडिओ स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. २७ एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजल्यापासून नाट्यगृहातील तिकीट खिडकीवर बुकिंग सुरू करण्यात आले. प्रेक्षकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. लोक नाटकांचे फलक वाचून जात होते, तिकीट खिडकीवर चौकशी करत होते,…
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बोरिवलीतर्फे आयोजित ‘सुवर्ण कलश २०२२’ या राज्यस्तरीय खुल्या मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी २२ एप्रिल रोजी दणक्यात पार पडली. या अंतिम फेरीत दाखल झालेल्या स्पर्धक संस्था आणि त्यांनी सादर केलेल्या एकांकिकांची यादी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. हा माहिती देणारा लेख जर तुम्ही वाचला नसेल तर पुढील लिंकवर नक्की वाचा. सुवर्ण कलश २०२२ अंतिम फेरी — राज्यस्तरीय खुली मराठी एकांकिका स्पर्धा आपण नाटकांवर जितकं प्रेम करतो तितकंच प्रेम आपण या विविध नाट्यकृतींवर आधारित स्पर्धांवरही केलं पाहिजे. विश्वास ठेवा! या स्पर्धा बघणं म्हणजे एक पर्वणी असते. अंतिम फेरीत स्पर्धक संस्थांमध्ये चुरशीचा सामना असतो. प्रयोगाआधीची स्पर्धकांच्या मानतील हुरहूर,…
[Update: ३० मे, २०२२] राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झालेला आहे. निकाल जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. ६० व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर! सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केलेल्या घोषणेनुसार हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूरला आयोजित होणार आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दिनांक ६ मे रोजी १०० व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने व स्मृती शताब्दी वर्षानिमित्ताचे औचित्य साधून कोल्हापूर येथे या स्पर्धा घ्याव्यात अशी मागणी कोल्हापूरकरांनी केली होती. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतींना नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य व राजर्षी शाहू महाराज यांची स्मृतिशताब्दी या निमित्ताने कोल्हापूर मधील संगीतसूर्य…
एकीकडे ‘मानवता हाच खरा धर्म’ असे सुविचार गिरवणारा माणूस दुसरीकडे ‘तुझं आडनाव काय?’ या प्रश्नात नेमकं कुठलं उत्तर शोधत असतो? धर्म मोठा की माणूस मोठा? मंदिरात जातो तो हिंदू, मशीदीत जातो तो मुस्लिम, गुरुद्वारेत जातो तो शीख मग या सगळ्यात माणूस कुठे राहिला? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळवून देणारं आजच्या काळातलं सुज्ञ नाटक म्हणजे सुनील हरिश्चंद्र लिखित-दिग्दर्शित ‘मोस्ट वेलकम’! मोस्ट वेलकम हे फक्त एक नाटक नसून आजवर उगीचच गुंता होऊन बसलेल्या आणि क्लिष्ट भासू लागलेल्या ‘मानवते’च्या व्याख्येला नव्याने प्रकाशात आणणारं एक वादळ आहे. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हे नाटक बघून त्यातून सुयोग्य बोध घेणं ही आजच्या काळाची गरज आहे.…






