प्रकाशयोजनाकार उन्मेष वीरकर यांच्या अनुभवाची शिदोरी एखादा सिनेमा जर यशस्वी करायचा असेल तर तुमचा छायाचित्रकार (कॅमेरामन) आणि संकलनकार (एडिटर) हे खुप महत्वाचे घटक असतात. छायाचित्रकार दिग्दर्शकाला सिनेमाद्वारे काय सांगायचे आहे हे टिपत असतो आणि संकलनकार सिनेमाची लय, गती यांचा योग्य समन्वय साधून सिनेमा दिग्दर्शकाच्या हवाली करतो. किंबहुना असंच म्हटलं जातं सिनेमा हा नेहेमी एडिटिंग टेबलवरच बनतो. म्हणूनच विदू विनोद चोप्रा, सत्यजित रे यांच्यासारखे एडिटिंगवर वर्चत्व असलेले दिग्दर्शक खूप यशस्वी झाले. सिनेमा क्षेत्रातील छायाचित्रकार आणि संकलनकार या भूमिका नाट्यक्षेत्रामध्ये प्रकाशयोजनाकार हा एकटा पार पाडत असतो. रंगमंचावर अनेक कलाकार असताना बाकी सर्व कलाकारांना कमी प्रकाशात ठेऊन, फक्त एका कलाकारांवर फोकस करून संपूर्ण…
Author: रंगभूमी.com
कोरोनाच्या lockdown मुळे घरात बसलोय. उगाचच भूतकाळाबद्दल विचार करायला लागलो आणि अचानक आठवण आली की कॉलेजात असताना मला वाचनाचा जबरदस्त छंद होता. जो आता माझ्या बाबतीत जवळ जवळ नामशेष झालायं. कारण एकच – संसारात पडलो आणि निवृत्तीनंतर आळस. मग ठरवलं – वाचन सुरु करायचं. घरातली सर्व वर्तमानपत्रं काढली. माझी एक सवय, मी वर्तमानपत्र शेवटच्या पानापासून वाचायला सुरुवात करतो. त्याप्रमाणे म.टा. च्या १५ मार्चच्या अंकाचं शेवटचं पान समोर घेतलं. प्रथमेश राणे लिखित लेखाचा मथळा पाहिला, “चित्रपटांना ‘कंटेनर थियेटर’ चे दिवस” हा लेख वाचून काढला. सिंधुदुर्ग फिल्म फेस्टिवल मध्ये ही संकल्पना उदयास आली असं लेखकाने लिहिलंय. ‘कंटेनर थियेटर’ म्हणजे फिरते थियेटर म्हणजेच टुरिंग टॉकीज – मोबाईल थियेटर. शहरातील थियेटरमध्ये, शहराबाहेरील…
अलिकडच्या काळातील नाट्य/सिनेसृष्टीला श्री. विजय कदम हे नाव काही नवीन नाही. आपल्या हजरजबाबी विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने केव्हांच जिंकली आहेत. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यातील अभिनयाचे गुण विकसित होत गेले. सुप्रसिद्ध संगीतकार राम कदम हे त्यांचे वडील. परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कुलमध्ये असताना शाळेच्या पाच दिवसीय गणेशोत्सवात प्रत्येक वर्गाचे नाटक वा नृत्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. त्यात ते नाटकांमध्ये हिरिरीने भाग घेऊन वर्गाला व स्वतःला उत्तम पारितोषिक मिळवून देत असंत. त्याचीच पुनरावृत्ती पुढे दिवाळीच्या सुट्टीनंतर होणाऱ्या स्नेहसंम्मेलनातील कार्यक्रमाच्या वेळी होत असे. तेव्हाही हिरिरीने नाट्यप्रवेशात भाग घेऊन ते चमकत असत. आताचे सुप्रसिद्ध कलाकार श्री. नागेश मोर्वेकर यांचीही त्यांना तेंव्हा उत्तम साथ…
मराठी माणूस आणी रंगभूमी किंवा नाटक यांचं नातं केवळ अजोड आहे. पाण्याशिवाय मासा जिवंत राहू शकत नाही, तसंच मराठी माणूस नाटकाशिवाय जगणं अशक्य! मराठी रंगभूमी आज चौफेर घोडदौड करत आहे. या सर्वामागे कलाकार, तंत्रज्ञ त्याचप्रमाणे बॅकस्टेज कलाकार यांचंही योगदान मोठं आहे. काही दशकांपूर्वी कै. बालगंधर्व, मा. दिनानाथ, अशा मातब्बर कलाकारांनी संगीत नाटकांच्या रूपाने रंगभूमीला सुवर्णकाळात नेऊन ठेवले. कालांतराने तंत्रज्ञानात प्रगती झाली. मूकपट, बोलपट, चित्रपट आले. पडद्यावर हलणारी, बोलणारी चित्रे पाहून प्रेक्षक हरखून गेला. सिनेमा थियेटरकडे वळलेला प्रेक्षकांचा वाढता ओघ थांबवण्याचे व त्याला पुन्हा रंगभूमीकडे वळवण्याचे मोठे दिव्य नाट्यकर्मींना करावे लागले. पुढे चीन, पाकिस्तान या पारंपारिक शत्रूंनी लावलेली युद्धे, त्यामुळे निर्माण…