प्रशांत दामले यांना ‘रंगमंचावरचा बादशाह’ का म्हणतात त्याचा पुन:प्रत्यय देणारी कलाकृती म्हणजे त्यांचं हे नवं नाटक ‘शिकायला गेलो एक’! प्रशांत दामले विनोद करतात तेव्हा अख्खं नाट्यगृह हास्यसागरात डुबून जातं… ते हळवे झाले की प्रेक्षकांच्या डोळ्यातही टचकन पाणी येतं… ते गातात तेव्हा त्यांचा मधुर आवाज प्रेक्षागृह मंत्रमुग्ध करून टाकतो. अरेच्चा! हे सगळं खरं तर तुम्हाला माहितीये ना! पण ‘दी’ प्रशांत दामले जेव्हा एखाद्या सुपरहीट हिंदी गाण्यावर ठेका धरतात तेव्हा तमाम रसिक प्रेक्षक भान हरपून टाळ्यांच्या जल्लोषात गुंग होऊन जातात, याची अनुभूती घ्यायची असेल तर लवकरात लवकर तुम्हाला भेट द्यावी लागेल गौरी थिएटर्स निर्मित, प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘शिकायला गेलो एक’…
Author: रंगभूमी.com
‘अंजू उडाली भुर्र’ या बालनाट्याचा तालमीचा शुभारंभ नुकताच झाला. श्री. अशोक पावसकर आणि सौ. चित्रा पावसकर हे दांपत्य गेली पन्नास वर्षे बाल रंगभूमीच्या क्षेत्रात निस्वार्थ सेवा करत आहे. ह्या जोडप्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकार प्रगल्भ झाले आणि त्यांना सन्मान प्राप्त झाला. आता, पावसकर दांपत्य, डॉ. सलील सावंत ह्या तरुण निर्मात्याच्या सहकार्याने ‘अंजू उडाली भुर्र’ रंगमंचावर आणत आहेत. या नाटकाचे लेखन गुरुवर्य नरेंद्र बल्लाळ यांनी ५५ वर्षांपूर्वी केले होते, तेव्हा प्रसिद्ध अभिनेत्री ईला भाटे ह्यांनी अंजूची भूमिका साकारली होती. या नाटकात प्रसिद्ध अभिनेते दिगंबर राणे आणि पावसकर दांपत्य यांनीही भूमिका साकारल्या होत्या. प्रेरणा थिएटर्स प्रस्तुत ‘अंजू उडाली भुर्र’ हे नाटक १९ एप्रिल…
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने साजरा होणार ‘बहुभाषिक नाट्य महोत्सव’! 100th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan नाट्यपरिषद ही आपल्या मराठी नाट्यसृष्टीची शिखर संस्था. नाटक, रंगकर्मी आणि प्रेक्षक यांच्यातील सेतू म्हणून काम करत असताना अनेक अभिनव उपक्रम, संकल्पना नाट्यपरिषद सातत्याने राबवत असते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे प्रथमच विशेष नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला नाट्यपरिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले, उपाध्यक्ष (उपक्रम) श्री. भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह श्री. अजित भुरे , कार्यकारिणी सदस्य सविता मालपेकर आदि मंडळी उपस्थित होती. २० फेब्रुवारी…
रंगभूमी.com तर्फे गेली ४ वर्षं तुम्हाला सातत्याने नाट्यसृष्टीशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आजही अविरत सुरू आहे. नवीन नाटकांबद्दल माहिती, त्याबद्दलच्या प्रेक्षक प्रतिक्रिया आणि पुढील प्रयोगांचे वेळापत्रक, कलाकारांच्या मुलाखती आणि बरंच काही आम्ही आमच्या Website, YouTube, Instagram, आणि इतर काही माध्यमातून तुमच्या भेटीसाठी आणत असतो. याच प्रवासात आज आम्ही एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. एक दमदार एकपात्री नाट्यकृती प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचा विचार गेले काही महिने आमच्या मनात सतत डोकावत होता आणि पुण्यातील एका युवा दिग्दर्शकाच्या पुढाकाराने हा विचार प्रत्यक्षात उतरवून दाखवलाय. त्या युवकाचं नाव आहे शिवम पंचभाई! याआधी ‘अंडासेल’ आणि ‘दोन भुते’ या नाटकांचं दिग्दर्शनही त्याने केलं होतं. आता दि.…
प्रायोगिक नाटक या नाट्य प्रकारात नाटक या माध्यमाच्या सादरीकरणात प्रयोग अपेक्षित असतो. ज्यातून माध्यमाच्या नवीन शक्यता पडताळून बघितल्या जातात. एका वेगळ्या प्रकारची अनुभव निर्मिती त्यातून करण्याचा प्रयत्न वेगवेगळे प्रायोगिक नाटकाचे संच करून बघत असतात. महाराष्ट्राला प्रायोगिक नाटकाची मोठी परंपरा आहे. त्याच परंपरेला पुढे चालू ठेवत पुणे, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात सुद्धा वेगवेगळे नाटकाचे ग्रुप नवीन प्रकारचं, नव्या धाटणीचं, नवीन काहीतरी सांगू पाहणारं नाटक करू बघता आहेत. असाच प्रयत्न करू बघणारा पुण्यातील प्रायोगिक नाटक ग्रुप म्हणजे Incomplete Theatre! सध्या या ग्रुपचं दोन भुते हे वि. स. खांडेकर यांच्या लघुकथेवर आधारित नाटक पुण्यात सुरू आहे. आजवर त्याचे १२ प्रयोग झाले असून,…
सध्या रंगभूमीवर थोड्या हटके विषयावरील नाटकांचा ट्रेंड सुरू आहे. जितका हटके विषय तितकीच हटके नाटकांची नावंदेखील असतात. लवकरच सुमुख चित्र आणि अनामिका प्रस्तुत ‘पाहिले न मी तुला’ हे नवंकोर नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे. नावावरून आपल्याला गोड प्रेमकथा असावी असे वाटते. पण तसं नाहीये. लेखक-दिग्दर्शक सुनिल हरिश्चंद्र यांनी नात्याच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टीचा वेध यातून घेतला आहे. Sunil Harishchandra सुनील हरिश्चंद्र लिखित-दिग्दर्शित ‘मानलेली गर्लफ्रेंड’, ‘मोस्ट वेलकम’, ‘ऊर्मिलायन’ या कलाकृती ज्यांनी पाहिल्या आहेत त्यांना त्याच्या लेखणीतील वेगळेपण आणि स्पष्टवक्तेपणा यांचा अंदाज असेल. जे आपल्याला लिखाणातून, विचारांतून किंवा अनुभवातून उमजलंय त्याची तंतोतंत अनुभूती प्रेक्षकांना घडवून देणे, यात सुनीलचा हातखंडा आहे. नाटकाबद्दल थोडंसं… सध्या…
झी मराठी वरील नावाजलेल्या मालिकांपैकी तरुणाईच्या विशेष पसंतीस उतरलेली एक मलिका म्हणजे ‘दिल दोस्ती दुनियादारी’! या मालिकेमधून सुव्रत जोशी आणि सखी गोखले ही जोडी अगदी घरघरात पोहोचली. मालिका संपल्यानंतर, २०१६ साली ‘अमर फोटो स्टुडिओ’ या सुपरहीट नाटकातून ही जोडी पुन्हा आपल्या भेटीस आली. २०१९ साली, विवाह बंधनात अडकून या दोघांनी प्रेक्षकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. ही गोड जोडी पुन्हा एकदा एक दर्जेदार नाटक घेऊन आपल्या भेटीसाठी येत आहे. हे नाटक म्हणजे मल्हार व कलाकारखाना निर्मित दोन अंकी मराठी नाटक ‘वरवरचे वधूवर’! सुव्रत आणि सखीच्या आजवरच्या कारकीर्दीचा आढावा घेतला तर त्यांची कथेची अचूक निवड आणि कामावरच्या अमाप निष्ठेचा आपल्याला अंदाज येतो.…
रत्नाकर मतकरी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘काळी राणी’ या नाटकाला पहिल्यांदा भेट देणार होते तेव्हा सहज कानावर आलं होतं की, ‘या नाटकाच्या विषयाला मरण नाही’. उत्कंठा वाढली. नाटक बघितलं आणि त्या सहज कानावर पडलेल्या शब्दांची प्रचिती आली. खरंच या नाटकाला अजिबात मरण नाही. कारण, नाटकाचा विषय आहे बॉलिवूड! चित्रनगरी! मायानगरी… स्वप्ननगरी. या नाटकातून ८० च्या दशकातील बॉलिवूडचं दर्शन घडतं. स्वप्ननगरीत कित्येक जण रोज स्वतःचं नाशिब आजमावताना दिसतात. चालतात. धडपडतात. पडतात. पुन्हा नव्या जोमाने उभे राहतात. अशी कोणती भुरळ घालते ही चित्रनगरी की भले भले आपलं कुटुंब, घर, आपली जवळची माणसं सोडून चित्रनगरीकडे धाव घेतात? अगदी एका मिनिटासाठीही पडद्यावर झळकता…
‘क्रेसेंट थिएटर’चं शनैश्वरम् (दशावतार) हे नाटक सध्या प्रेक्षकांची खूपच वाहवा मिळवतंय. नाटकाचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की या नाटकातील बहुतांशी कलाकार हे ‘मुंबई स्कूल ऑफ ड्रामा’ या संस्थेतून अभिनयाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण संपादन केलेले विद्यार्थी आहेत. दशावतार हा लोकनाट्यप्रकार अतिशय लोकप्रिय आहे. कोकणात हा नाट्यप्रकार जितका सर्रास बघायला मिळतो तितकाच शहरांमध्ये तो आजही दुर्मिळच आहे. गावी वा इतरत्र किमान एकदा तरी दशावतार बघितलेल्या कित्येकांना, त्या अनुभवाबद्दल बोलताना रममाण होऊन जाताना मी स्वतः अनुभवलंय. ‘क्रेसेंट थिएटर’ने आज तमाम प्रेक्षकांसाठी दशावतार बघण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. मुंबईत या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग सध्या जोरात सुरू आहेत. ७ जुलै रोजी मुलुंड येथील प्रयोग ऐन…
नाटकाचं शास्त्र गवसलं की या शास्त्रात अधिकाधिक निपुणता संपादन करण्याचा ध्यास घेऊन कार्यरत असणारे रंगकर्मी आपण जाणतो. पण नाटक जिवंत ठेवण्यासाठी धडपडणारे, नाटकासाठी प्रेक्षकवर्ग तयार करणारे रंगकर्मी हातावर मोजण्याइतके आहेत. या यादीतील अग्रस्थानी येणारं एक महत्त्वाचं नाव म्हणजे नाट्यलेखक, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि नाट्यप्रशिक्षक अतुल पेठे! अतुल पेठे यांनी नुकतंच फेसबूकवर एक मनोगत व्यक्त केलं. हे मनोगत आहे… पुण्यातील प्रायोगिक रंगभूमीच्या इतिहासाबद्दल, विकासाबद्दल आणि आज तेथे मिळालेल्या मानाच्या स्थानाबद्दल! आजच्या तारखेला, प्रायोगिक नाटकांसाठी पुण्यात बऱ्याच ठिकाणी, खऱ्या अर्थाने हक्काचं व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे. पण त्यामागचा इतिहास काय? छोट्याशा जागेतून, घरातून प्रायोगिक नाटकं सादर करत हळूहळू पुण्यातील प्रायोगिक रंगभूमीची वृद्धिंगत होणारी…
नव्या पिढीला जुनी अजरामर नाटकं ‘प्रत्यक्ष’ बघता यावीत या हेतूने प्रशांत दामले ‘गेला माधव कुणीकडे’ हे त्यांचे सुपरहीट नाटक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. ‘अरे हाय काय अन् नाय काय’… असं म्हणत रंगभूमीवर धुमाकूळ घालणारा माधव धुमाकूळ घालायला पुन्हा सज्ज झालेला आहे. गेले काही दिवस प्रशांत दामले आपल्या फेसबूक पेजवर ६३ चा आकडा आणि नवं नाटक येतंय, असे काही पोस्टर शेअर करुन प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत होते. नवं नाटक कोणतं याचं उत्तर आज आपल्याला मिळालेलं आहे. ‘अरे हाय काय अन् नाय काय’ असे म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडगोळी सज्ज झाली आहे.…
आपण आरशात पाहतो तेव्हा आपल्याला आपल्यासोबत सभोवतालच्या जगाचं प्रतिबिंब दिसतं. आरश्याच्या आवाक्यातील एकही गोष्ट त्याच्या प्रतिबिंबापासून लपत नाही. सगळं जसंच्या तसं दिसतं. एका ‘प्रतिबिंबाच्या’ स्वरूपात! लेखकाचंही असंच असतं. त्याचे विचार, त्याच्यावरील संस्कार आणि त्याच्या सभोवतालची परिस्थिती या सगळ्याचं प्रतिबिंब शब्दांच्या स्वरूपात कथा, कविता, गीताच्या माध्यमातून एखाद्या कागदावर, खडकावर आणि आजकाल मोबाईल फोनवरही उमटतं. अशाच काही प्रतिभावंत लेखकांच्या लेखणीचा सन्मान करत त्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देणारा, NCPA द्वारे आयोजित मराठी नाट्य उत्सव म्हणजे प्रतिबिंब २०२४! NCPA Pratibimb 2024 यंदाचा उत्सव बऱ्याच कारणांसाठी महत्त्वाचा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दिलीप प्रभावळकर लिखित आणि नीरज शिरवईकर यांची रंगवृत्ती असलेलं, विजय केंकरे दिग्दर्शित…