आपण आरशात पाहतो तेव्हा आपल्याला आपल्यासोबत सभोवतालच्या जगाचं प्रतिबिंब दिसतं. आरश्याच्या आवाक्यातील एकही गोष्ट त्याच्या प्रतिबिंबापासून लपत नाही. सगळं जसंच्या तसं दिसतं. एका ‘प्रतिबिंबाच्या’ स्वरूपात! लेखकाचंही असंच असतं. त्याचे विचार, त्याच्यावरील संस्कार आणि त्याच्या सभोवतालची परिस्थिती या सगळ्याचं प्रतिबिंब शब्दांच्या स्वरूपात कथा, कविता, गीताच्या माध्यमातून एखाद्या कागदावर, खडकावर आणि आजकाल मोबाईल फोनवरही उमटतं. अशाच काही प्रतिभावंत लेखकांच्या लेखणीचा सन्मान करत त्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देणारा, NCPA द्वारे आयोजित मराठी नाट्य उत्सव म्हणजे प्रतिबिंब २०२४! NCPA Pratibimb 2024 यंदाचा उत्सव बऱ्याच कारणांसाठी महत्त्वाचा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दिलीप प्रभावळकर लिखित आणि नीरज शिरवईकर यांची रंगवृत्ती असलेलं, विजय केंकरे दिग्दर्शित…
Author: रंगभूमी.com
सस्पेन्स आणि थ्रिलर कथानकातील नाट्य अनुभवायचे असेल तर मुळात कथा, पटकथा, संवाद, अभिनय आणि दिग्दर्शन यांची योग्य भट्टी जमायला हवी. अस्मय थिएटर्स निर्मित– सस्पेन्स थ्रिलर “मास्टर माईंड” या नाटकात ह्या सगळ्यांचा अचूक मेळ बसविण्यात विजय केंकरे यांची दिग्दर्शकीय कल्पकता कमालीची यशस्वी झालेली दिसून येते. या रहस्यमय दोन अंकी नाटकाच्या कथेमधील सस्पेन्स प्रेक्षकांना कायम संभ्रमात ठेवतो. आपण बांधलेले ठोकताळे इथे निष्प्रभ ठरतात. नाटकाच्या शेवटातील शेवटचा भाग उलगडेपर्यंत अर्थात अगदी शेवटच्या सेकंदाला मिळालेल्या कलाटणीने खुर्चीला खिळून राहिलेला प्रेक्षक अचंबित होतो. “मास्टर माईंड” कोण? ‘तो’ का ‘ती’ किंवा आणखी कोणी ‘तिसरा’ याचा विचार करत प्रेक्षक कथानकाच्या गुंत्यात नकळत गुरफटत जातात. सदर नाटकातील सस्पेन्स…
२०२० साली, २७ मार्च रोजी म्हणजेच जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभमुहूर्तावर रंगभूमी.com ची स्थापना झाली. सर्वप्रथम, तुम्हा सर्वांना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गेली ४ वर्षे आम्ही सातत्याने नाट्यक्षेत्रात कार्यरत आहोत. आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही ‘नाट्यदरबार #२’ ची घोषणा करत आहोत. आमच्या पहिल्यावहिल्या नाट्यदरबाराला तुम्ही जसा ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद दिलेला तसाच तो याही नाट्यदरबाराला द्याल याची आम्हाला खात्री आहे. आम्हाला हे सांगावयास अतिशय आनंद होत आहे की यावेळी, अवतरण अकादमी ही संस्था या उपक्रमात आमच्यासोबत जोडली गेली आहे. एप्रिलच्या पहिल्या रविवारी, ७ एप्रिल रोजी आम्ही घेऊन येत आहोत अवतरण अकादमी प्रस्तुत आणि रंगभूमी.com आयोजित कार्यक्रम ‘नाट्यदरबार #२’! बोरीवलीमधील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरातील…
“नवा गडी नवं राज्य” च्या अभूतपूर्व यशानंतर जवळजवळ दहा वर्षांनी प्रिया बापट आणि उमेश कामत या लोकप्रिय जोडीचे “जर तरची गोष्ट” हे नाटक रंगमंचावर सध्या धुमाकूळ घालत आहे. लेखिका इरावती कर्णिक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून निर्माण झालेल्या आणि आजच्या काळातल्या नातेसंबंधाची गोष्ट सांगणार्या ह्या नाटकाने नाट्यरसिकांच्या मनावर गारुढ केले आहे. वर्तमान पिढीला साजेसे आणि त्यांना स्वाभाविक प्रतिक्रिया व्यक्त करायला भाग पडणारे हे नाटक जुन्या व नवीन पिढींच्या पसंतीस उतरणारे आहे. आपल्या आजूबाजूच्या जगात घडणाऱ्या गोष्टीं आणि त्या अनुषंगाने जीवनात होणारे बदल, यांचा नातेसंबंधावर होणारा परिणाम यावर गोष्ट आधारित असल्याने, ती प्रेक्षकांच्या मनाला भावते. आपल्या मागच्या पिढीला उमजलेल्या जगाबरोबर आणि त्यांच्या पावलावर…
न्यूज चॅनेल बघून किंवा वर्तमानपत्रातील ताज्या बातम्या बघून आपण ‘चाय पे चर्चा’ करत कित्येकदा अगदी सहजपणे म्हणून जातो, “तिसरं महायुद्ध अटळ आहे.” पण खरंच जर महायुद्ध झालं तर त्या युद्धाचं स्वरूप, त्याची भीषणता कुठल्या थराची असेल याची अद्याप आपल्याला किंचीतही जाणीव नाही. हाच पहिला विचार आलेला माझ्या डोक्यात जेव्हा मी ‘देवमाणूस’ नाटक बघून नाट्यगृहातून बाहेर पडले. ताजे चेहरे घेऊन अतिशय वेगळ्या आणि महत्वपूर्ण अशा ज्वलंत विषयाचे नाटक घेऊन आल्याबद्दल सर्वप्रथम भद्रकाली प्रोडक्शनचे आणि प्रामुख्याने प्रसाद कांबळी यांचे अभिनंदन आणि खूप खूप कौतुक! आणि इतकी सुंदर नाट्यकृती स्वतःच्या लेखणीतून अस्तित्वात आणल्याबद्दल शंतनू चंद्रात्रे यांचे हार्दिक अभिनंदन, आणि खूप आभार. भद्रकालीतर्फे याआधीही…
हटके विषय निवडून रंगभूमीवर बराच काळ अधिराज्य गाजवणारी नाटकं तशी क्वचितच! त्यातही ‘fantasy’ वर आधारित नाटकं त्याहूनही कमी. असंच एक नाटक १३ ऑगस्ट, २०१६ रोजी, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे पहिल्यांदा रंगभूमीवर अवतरलं. हे नाटक म्हणजे सुबक निर्मित, मनस्विनी लता रवींद्र लिखित व निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित, ‘अमर फोटो स्टुडिओ’! गुणी कलाकारांची खुमासदार पंगत असलेलं आणि प्रेक्षकांच्या मनात आजवर स्थान करुन राहिलेल्या या नाटकाने लॉकडाऊनच्या आधी २५० पेक्षा जास्त प्रयोगांचा टप्पा पार केला. लॉकडाऊनमुळे पडद्याआड गेलेलं हे नाटक येत्या ७ जानेवारी २०२३ पासून रंगभूमीवर पुनरागमन करत आहे. हे या नाटकाचे शेवटचे आणि मोजके प्रयोग असल्याचे नाटकातील कलाकारंद्वारे सांगण्यात येत आहे. या…
लग्न कि लिव्ह-इन हा वाद जुनी पिढी व सद्याची तरुणाई यांचेमध्ये कायमचं रंगताना दिसतो. या बहुचर्चित विषयाच्या वादाला एका निष्कर्षाप्रत आणणारे आणि कधी भावनिक तर कधी विनोदी पध्दतीने भाष्य करणारे नाटक म्हणजे “आमने सामने“. लग्नसंस्था, लिव्ह-इन रिलेशनशीप आणि जनरेशन गॅप हा विषय प्रेक्षकांपुढे नव्याने मांडण्याची लेखक आणि दिग्दर्शक निरज शिरवईकर यांची पध्दत खूपच वेगळी, आश्चर्यकारक आणि मनाला भावणारी आहे. विशेष म्हणजे हे नाटक फक्त रंगमंचावरील कलाकारांचेच न राहता त्यामध्ये प्रेक्षकांना सुध्दा सामावून घेण्यात लेखक- दिग्दर्शक आणि कलाकार प्रचंड यशस्वी झालेले आहेत. अनेक वर्षे संसार केलेल्या जुन्या पिढीतील जोडप्याला एकमेकांबद्दल माहित असलेल्या गोष्टी आणि नुकतेच रिलेशनशिप मध्ये आलेले व लिव्ह-इन मध्ये…
मराठी नाट्यसृष्टीसाठी २०२२ हे महत्वाचं वर्ष ठरलं. कोरोना महामारीनंतर नव्याने उभ्या राहिलेल्या या विश्वात सर्व दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी ताज्यातवान्या कथांसह बहारदार नाटकांची मेजवानी आणली. जमेची बाजू म्हणजे वर्षाच्या शेवटापर्यंत ही मेजवानी सुरुच आहे. अजूनही नवनवी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत आणि याच यादीतील प्रेक्षकांच्या भेटीस येणारं एक नवकोरं नाटक म्हणजे थँक्स डियर. निखिल रत्नपारखी आणि हेमांगी कवी अभिनीत या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग २५ डिसेंबर रोजी चिंचवडमधील वा. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षगृह आणि पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे अनुक्रमे दुपारी १२.३० आणि सायंकाळी ५.३० वाजता सादर होणार आहेत. शहर असो वा ग्रामीण भाग, कलोपासक असोत वा बुध्दीजीवी प्रत्येक क्षेत्रात शर्यत ही असतेच.…
वीर-झारा, रोमिओ-ज्युलिएट, राज-सिमरन या आणि अशा काही खास ऑन-स्क्रीन जोड्या कित्येक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर गारूढ करुन आहेत. जानेवारी, २०२२ मध्ये या यादीत अजून एका सुपरहीट जोडीचं नाव जोडलं गेलं. ते म्हणजे, ‘संज्या छाया’! इतर जोडयांप्रमाणे गुडीगुडी किंवा भडक लव्ह स्टोरी नाही तर त्यांच्या आयुष्यातील साधेपणा हीच या जोडप्याची खासियत आहे आणि याच साधेपणाच्या जोरावर २७ नोव्हेंबर रोजी ‘संज्या छाया’ दमदार सेंच्युरी पूर्ण करणार आहेत. प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘संज्या छाया’ हे नाटक सहज सोप्या आयुष्याची व्याख्या करुन देतं. सहज सोपं आयुष्य कसं जगावं यासाठी मार्गही सुचवतं. प्रशांत दळवी यांचं दर्जेदार लेखन, वैभव मांगले व निर्मिती सावंत या…
महाराष्ट्रात विद्यापीठातील युवा महोत्सवांना खूप महत्व दिले जाते. अशाच एका युवा महोत्सवात नाटक सुरू असताना ते बंद करण्यात आल्याचे दृश्य समोर आले आहे. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान युवक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या युवक महोत्सवात १६०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होते. पण या युवा महोत्सवातील एका नाटकाच्या सादरीकरणादरम्यान प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि सुरू असणारे नाटक बंद करण्यात आले, असे एका व्हायरल व्हिडीओमध्ये दिसण्यात येते. १७ ऑक्टोबर, २०२२ रोजी युवक महोत्सव कार्यक्रमादरम्यान विद्यापीठाच्या स्टेज क्रमांक ३ वर नाट्यरंग सुरु होते. राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या भूमिकेत विद्यार्थ्यांचे सादरीकरण सुरू असताना त्यात…
महाराष्ट्र राज्यात प्रत्येक कलेला महत्व दिले जाते आणि नाट्यसंस्कृती प्रामुख्याने जपली जाते. महाराष्ट्र राज्यात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृह उभारण्यात आली आहेत. त्यात मुंबई आणि पुणे शहरात सर्वात जास्त नाट्यगृहं आहेत. या प्रमुख शहरांसह अनेक नगरपालिका कार्यरत आहेत, आणि असेच एक महानगर ओळखले जाणारे शहर म्हणजे मिरा-भाईंदर. जेव्हा महाराष्ट्रात कला जपली गेली तेव्हा त्या सार्थ प्रयत्नांना योग्य व सर्वोत्कृष्ट नाव दिले गेले आणि असेच काहीसे मिरा भाईंदर शहरातही घडले आहे. येथील स्थायिक प्रेक्षकांसाठी एक अवाढव्य नाट्यगृह बांधण्यात आले. बांधकाम तयार असूनही बऱ्याच कालावधीसाठी काही सामाजिक व राजकीय कारणांमुळे या नाट्यगृहाचे उद्घाटन लांबणीवर गेले. पण आता ही प्रतीक्षा संपली आहे. आमदार निधीतून…
रंगभूमीवर प्रचंड गाजलेले ‘चारचौघी’ हे नाटक ३१ वर्षांनी पुन्हा एकदा नव्या संचात रंगभूमीवर येत आहे. ‘जिगीषा’ या नाट्यसंस्थेतर्फे हे नाटक नव्याने सादर होत आहे. या नाटकाचा शुभारंभ शनिवार, १७ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे. https://www.youtube.com/watch?v=CJvMt2qDBZs ‘चारचौघी’ या नाटकाच्या नव्या संचात रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, श्रेयस राजे, निनाद लिमये, पार्थ केतकर आणि मुक्ता बर्वे या कलाकारांच्या भूमिका आहेत. या नाटकाचे निर्माते श्रीपाद पद्माकर असून, सूत्रधार प्रणित बोडके आहेत. या नाटकाचे लेखन प्रशांत दळवी यांनी केले असून, दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे. अशोक पत्की यांचे संगीत, संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य, रवी-रसिक यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे.…